header ads

Saturday, 16 July 2016

व्यक्ती आणि वळवळ - 'पु.लं'ना समर्पित

हा ब्लॉग माझे आवडते लेखक, संगीतकार, वक्ते, अभिनेता पुलंना समर्पित. त्यांच्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकांपासून प्रेरित आहे. 

Sketch by- प्रभाकर वाईकर
माझ्या आदर्श व्यक्तीमत्वांपैकी एक 'पु. ल. देशपांडे'. आणि आता तर ते माझे फेसबुक वर मित्र आहेत. इ.स. पूर्व जन्मानंतर सन १९९६ च्या महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमा द्वारे ईयत्ता ७ ला आमची दोघांची ओळख 'बटाट्याची चाळ' या पुस्कातील धड्याद्वारे झाली. त्या दिवसात मी काही अभ्यासू किंवा अवांतर वाचन करणारा विद्यार्थी नव्हतो. (खरं तर ते आता ही नाही.) त्या दिवसात सारे लेखक आपल्या वाईटवरच उठ्ल्यात असं मला वाटायचे. संतांवर तर माझा विशेष राग होता. तर असं आहे की, पुलंचा  'उपास' हा धडा आम्ही जेंव्हा शिकलो. शालेय जीवनातील पहिला लेखक ज्यांनी मला 'धडा' शिकवला नाही तर हसवला. मग त्यांच्या या हसवा-हसवीच्या मी जणू प्रेमातचं पडलो इतर धडे मग मला पुस्तकातील 'खोगीरभरती' वाटे. कायम स्मरणात राहणार तो दिवस होता. केवळ हाच लेखक आपल्या बाजूने असा  विश्वास ठाम झाला. 
माई कुठलाच दागिना घालत नसे, पण त्यांच्या आईने त्यांच्याकरिता एक मंगळसूत्र केलं होतं. त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, सुनीता ठाकूर आता कुंकू लावून आणि मंगळसूत्र घालून सुनीता देशपांडे झाल्या .
                                  पुलंची लेखन शैली एवढी साधी सोपी आहे की, वाचणाऱ्याला ती मंत्रमुग्ध करून टाकते. तरीही त्यांच्यातील वक्ता चांगला की अभिनेता, की वाचक हे ठरवणं खरंच खूप कठीण. अभिनेत्या वरून आठवण झाली काही वर्षा पूर्वी पुलंवर एक चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रपट 'गोळा बेरीज'  मध्ये संबंध पुल एक छताखाली आणणं किती कठीण आहे लक्षात आले. पुलंच्या लेखन शैली एवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यातील आवडलं नक्की काय हे ठरावं कठीण आहे. मला नेहमी पुलंसारखं होणं आवडेल. कधी - कधी आपण इतक्या उशिरा का जन्माला आलो असे वाटते.        



पुलांचे अंधश्रद्धे विषयीचे विचार वाचले कि, माझ्यासारख्या पामराकडे शब्दच उरात नाही  

Tuesday, 12 July 2016

'कोहिनूर भारताचा'

  
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची ही १२५ वा रौप्य जयंती महोत्त्सव. या दिवसाचे औचित्य साधून अनेक जणांनी आपल्या परीने या महोत्त्सवचा आनंद लुटला  त्याला कारण ही तसेच होते. ठिक-ठिकाणी पार्ट्या झाल्या नाविन्य साधण्याच्या नादात जे मनाला आवडेल ते; आणि जसे बरे वाटेल तसे केले. यात काहीच गैर नाही. करण हजारो वर्षाच्या विटाळातून त्या महामानवाने जगण्याचा हक्क दिला, भविष्य दिलं, अस्तित्व, ओळख, मूलभूत हक्क आणि लढण्याचा वारसा दिला.  

                


                                  "उपाशी जगाचा पसा होता
                                  असा भीम होता, असा भीम होता"
                                              - महाकवी वामनदादा कर्डक 

अनेक माध्यमांनी या विषयी चित्रपट, गाणी, विद्रोही गाण्याचे कार्यक्रम ठेवले होते. अनेकांनी या महोत्त्सवात आपला सहभाग दर्शवला. दरवर्षी प्रमाणे पाली भाषेने सलग १२ ते १७ तास अभ्यास करून त्यांना अदांजली अर्पित केली. अनेक 'पोस्टर बॉयस' त्यांच्या नावाचे भले मोठे होर्डिंग लावले. त्यांच्या प्रतिमेच्या किंवा कार्याचा, विचारांचा अदर कमी आणि यांचीच नामावली अधिक होती. आकाशवाणीने  अनेक घरगुती (म्हणजेच इन-हाऊस, ज्याची खबर कोणालाच नव्हती) कार्यक्रमाचं आयोजन केलं. यु.एन या सवंस्थेने तर अटकेपार हा महोत्सव साजरा केला. महान व्यक्तींच्या कामाचा आढावा त्यांचा आदर्श आपण घेऊन आपला विकास साधने हीच त्यांना वाहिलेली आदरांजली आहे. परंतु या मध्ये साऱ्यांनी इतर करतायेत म्हणून आपण करूया किंवा मग एक बुल्लेटीन किंवा फारतर RJ मेंशन मध्ये आटोपलं. त्यांच्या समोर "Time is money" हेच सूत्र समोर ठेवून ससेहोळट केली. पण ज्यांनी रुपीस चे सूत्र मांडळ त्याच तत्वाला बगल दिली. असो कोणी काय ? कसे केले ? या पेक्षा ज्यांनी केले त्यांच्या पाठीवर थाप द्यायलाच हवी. 'ABP माझा'  ने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर, विचारांवर 'प्रकाश' टाकण्याचा अनोखा प्रयत्न केलं त्यांच्या सर्वव्यापी आंबेडकर या
मालिके द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची या मालिके द्वारे नव्याने ओळख होते एवढं मात्र खरं...
  

Contributors